Tuesday 9 December 2014

Dost dost na raha......




कॉलेजची वेगळीच दुनियादारी
                                                          माझ्या या नव्या कॉलेजमध्ये एका मुलीने मला सहज विचारले अर्थात तिच्यासाठी सहजच...पण माझ्यासाठी अगदी विचार  करायला भाग पाडणारा प्रश्न ? तू बोलु शकतेस ना म्हणजेतू  मुकी आहेस का? मी २ मिनिटासाठी शांतच झाले.पुढे काही बोलली नसती तर खरंच हिला मी मुकीच वाटली असती मी हसून विचारल का ग ? असा का वाटला तुला त्यावर ती म्हणाली नाही  तुला कधी बोलताना पहिले नाही शांत असते झोपून असते.काही प्रोब्लेम तर नाही ना! BF शी भांडण वगेरे ? ती तिच्या जागी योग्य होती कारण सुरवातीच्या काही दिवसामध्ये ती ने मला बघितलंच नव्हत.
 मी हसत हसत म्हणाले असं काही नाहीये तुला वाटत असा तर अजिबातच नाही….  काय सांगणार  ह्या मुलीला माझ्या BMM च्या आयुष्यात म्हणजेच गेली ३ वर्षे  एक भलतीच दुनियादारी शिकून आले मी.  बघायला गेल तर शिल्लक साधारण भांडण  कॉलेजच्या ग्रुप मध्ये सगळ्याच होता.मात्र जीवाभावाचे मित्र ज्याच्यावर आपण जीवापाड प्रेम करतो त्याच मित्र-मैत्रीनी  जेव्हा "मैत्री'  या शब्दाचा अर्थ सुध्दा समजूशकत नाही.तेव्हा जास्त वाईट वाटत.मी bmmच्या 1st year ला cr झाले माझ्या बडबडीच्या स्वभावामुळे लोकप्रिय ही झाले.कोणाशी भाडंण-तटा नसून वर्षाच्या सुरवातीलाच आमचा चांगला ग्रुप तयार झाला मात्र माझ्या नाटकाच्या प्रकटीसमुळे हळूहळू मी कॉलेजला ही कमी जाऊ लागले या अगोदर आमच्या ग्रुपने खूप मज्जा केली होती सर्वाना सोबत बसणे ग्रुप सोबत फोटोकाढणे,  मज्जा मस्ती फक्त माझ्या ग्रुप मधल्या सर्वासोबत माझ चांगल आहे.असचं  वाटत होता मला आम्हांला ओळखणाऱ्या किंव्हा शिक्षकांना  ही कधी मनात पण वाटल नसेल कि माझे best frnd असे ही असू शकतात आमची १st semister झाली आणि त्यात मला A GRADE  मिळाला .या सगळ्यापेक्षा थोडेच अगदी ४ते ५ % जास्त मार्क्स मिळाले .आनंद होता कि ग्रुप मध्ये सगळे पास झाले याचाच.मात्र हा आनंद  माझ्या एकटीचाच होता  कारण 3idiots प्रमाणे दोस्त अगर फेल हो जाये तो दुख होता है.! लेकीन दोस्त अगर 1st आ जाये तो ज्यादा दुख होता है माझ्या पहिल्या येण्याचा मानसिक धक्का बहुतेक त्यातला दोघा-तिघांना झेपला नसावा म्हणूचच  आमच्या  मैत्रीत फूट  पडण्यास सुरवात झाली।  माझ्या शंभुराजे नाटकाच्या शो मुळे कॉलेजमध्ये होणारी गडबड  मला समजलीच  नाही, आमचा रिझल्ट लागला पण  मी उशीर आल्याने मला या पैकी कोणाचे  ही मार्क माहित नव्हते त्यात yyy ही ह्या वेळी पहिली आली.
आणि zzz  दुसरा आला  [या पात्रांची नावे घेऊ शकत नसल्याने yyy आणि xxx नावे वापरत आहे }. आणि तिसरी म्हणजे मी .माझा आनंद तरीही तोच होता कारण अजूनही मला यांचा प्रॉब्लेम कळलाच नव्हता.या सगळ्याच्या वागण्यातील बदल मला स्पष्टपणे जाणवत होता. मात्र या सगळीकडे दुर्लक्ष करून माझ्याकडून तुम्हाला गिफ्ट असेही मी साफ मनाने बोलली होती. मात्र झोल असा होता कि  या zzz ने त्यांच्या result ची कॉपी एडीट करून यावर zerox काढून खऱ्या मार्कांना लपवून झोल केला होता. त्याला जास्त मार्क्स मिळाले आहेत हे दाखवण्याचा प्रयत्नत्यात माझ्यां पासून लपवून मी तिसरी आले आहे असे सांगितले, माझे best friend जर असे बोलता आहे तर का जाऊ मी कोणाला विचारायला कि कोणाचे मार्क्स किती आणि काय?  .आंधळ्या विश्वासाने yyy आणि zzz यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून मी गप्प बसले. पण त्यांना माझ्याशी खोटं बोलून मला कमीपणा दाखवून कोणता बदला घेयचा होता हे मला आज पर्यंत समजले नाही                                                                                                                .मात्र बातमी अथवा गुपित कधी ना कधी फुटणारच zzz ने केलेला काळा बाजार result चा झोल आणि वाहत्या गंगेत हात धुवून yyy ने सुद्धा माझ्या मैत्रीचा गैरफायदा घेतला, मला जेव्हा ही गोष्ट समजली तेंव्हा मी माझ्या जुन्या सवयीप्रमाणे मी खूप रडले .ही तीच लोक आहे ज्यांना मी माझे best friend best मानत होते या परीक्षा तर होतच असतात पण .आपली मैत्री आणि त्यावर असणारा विश्वास माझ्यासाठी महत्वाचा होता पण हा विश्वास ह्या सगळ्यानी  गमावला होता तरी सुध्दा खोटे का होईना माझ्यासमोर first आणि second आलेल्या या  दोघांनाही मी गिफ्ट तर देणारच होते.त्यांनाही माझ्यातील बदल समजू लागला आणि जाणीवही झाली असावी बहुतेक . जर  खोटा result बनवून हे कोणालाच कळणार नाही असा वाटणारे हे माझे बेस्ट frnds आत्ता काळजीत यायला लागले कारण   इतका कांड करून ही गोष्ट सगळ्या समोर आली तर yyy आणि zzz यांचे चमचे आणि हितचिंतकांचे काय होईल ? कारण यात माझा पूर्ण group होता. पण  या सगळ्या गोष्टी सर्वांच्या समोर आल्या आणि  दुध का दुध और पाणी का पाणी हो गयामग काय ! माझ्या समोर चूक कबुल करून एकमेकांच्या नावावर चूक ढकलनारे माझे best frnd ? H O D जवळ सांगू  नकोस बोलणारे माझे best frndS  ?आम्ही असं  केल कारण तू 1st आलीच तू c.r आमच्या भावना दुखावल्या गेल्या असे फालतू कारण देणारे माझे best frnd ?संपूर्ण वर्गासमोर माझी माफी मागून माझ्या डोळ्यात आलेलं पाणी पाहणारे माझे best frnd…  सगळंच संपल मैत्री,नाती,विश्वास,आणि सुरू झाल.नव राजकारण मला तोडण्याचा  विचार करणारे माझे best frnd स्वत सुध्दा एकत्र राहू शकले नाही कोणी बँच सोडून गेल, तर कोणी तोंड काळ करून कॉलेजच सोडून गेला.  या सर्व गोष्ट समजून  घेण माझ्यासाठी खूपच कठीण होत्या .  शिक्षकांनी या प्रकाराला नाव ठेवली तर hod नी शांत रहा प्रकरण वाढवू नको असा सल्ला दिला मला ही आता या सगळ्यातून बाहेर यायचं होते.मात्र पुन्हा विश्वास ठेउन मैत्री करेल  असा तेव्हा कोणीच वाटत नव्हत पण देव सगळं  काही पाहतो शेवटी खर काय ते सगळ्यान समोर आलं
  जाता.जाता या प्रकरणातून मला काय मिळाल हे सगळ्यांना माहित आहेच. त्यानंतर माझ्या best frnd  शी मी काडीचा ही संबंध ठेवला नाही.आणि अशा फसव्या  राजकारण खेळणाऱ्या लोकांपासून लांबच राहण्याचे ठरवले माझ्यातली ही भीती अजूनही गेली नाही
 खर अशा लोकांसारखी माणसे मला पुढे नको देऊ रे देवा! हाच विचार करून सतत बडबड करणारी मी शांत होऊन गेले माझ्यातल्या याच भितीने मला मुकी केली आहे.
आज ही हा प्रसंग आठवला तर त्याआधी केलेली मजा मस्ती सगळं  काही आठवत पण दुधाने तोंड भाजल्यानंतर ताक पण फुकर मारून पिणार हेच

Saturday 6 December 2014

जीवन होऊ शकते सोपे…



                  आयुष्यातील गेलेला क्षण कोट्यावधी सुवर्णानी परत मिळत नाही. पैशाला जीवापाड जपलं जातं,तसा आपण आपल्या आयुष्यातील प्रत्येक दिवसाला दिवसातील प्रत्येक क्षणाला … जपलं पाहिजे कारणी लावला पाहिजे अनुभवांनी त्याचं सोनं केला पाहिजे. या जीवनात सारं घामानं आणि श्रमांनच मिळवायचं असतं, प्रामाणिक प्रयत्न हेच जीवनाचा बलस्थान असतं. प्रत्येकाचा जीवनात अडचणी येतात. चिंता दुख तर प्रत्येकाला सदैव धरून असतं. पण मनात जिद्द आणि जीवापाड कष्ट केले तर स्वप्न साकार होणं अवघड नाही.                                                                                                                                                                                आपल्याला मिळालेला जीवन हि कसदार जमीन आहे, तिची छाननी मशागत करून, निगराणी करून सुखात आपण जगायचा कि निष्काळजी राहून जीवनात खूप दुख आहे असा सांगत फिरत सुंदर जीवन वाळवांट बनवायचा हे ज्याने त्यानेच ठरवाव. खुपदा आपण एकतो, लोक आत्महत्या करतात कारण काहीही असो, पण आपल्यला वाटत असतं तसा जीवन कधीच नसतं, अखंडपणे करीत राहण्याची तडजोड असते. कोणासाठी तरी स्वताला मोल्ड करणे, गरजेचे असतेच. काळकाळ तर सतत पुढे जात असतो . सुख मिळवण्यासाठी काळा सोबत धावण्यात झगडण्यात जीवन संपून जाते आयुष्यभर मानहानीचे प्रसंग कुरतहत असतात. निमूट माधर घ्यावी लागल्याने पड खाल्याचे क्षण सतावत असतात शिवाय त्यावेळी मी असं का बोलले नाही? गप्प का राहिले? म्हणून आपण स्वतः चाच छळ करीत असतो. हे सार सोडता यायला हवा स्वताच्या सुखासाठी।                                                                                                                आपल्याला जे मिळत आहे ते आनंदाने स्वीकारून जीवन सुखाचे करणे आत्ता गरजेचे आहे. पण असा न होता उलट आपण माझंच नशीब असा का? नियती वर दोष देत खंत करीत बसतो . अशा रीतीने स्वतः शीच उभा दावा मांडून आपला वर्तमान आपणच नासवून टाकत असतो. खरं तर आयुष्यत आपल्याला किती तरी गोष्टी मिळालेल्या असतात काय काय मिळालं आणि काय नाही मिळालं याची यादी केली तर मिळालेल्या गोष्टी ध्यानात येत नाही आणि एखादी मिळाली नाही म्हणून हळहळण्यात सगळा जन्म वाया जातो. अविरत काम करणारे हे दोन हात, अखंड चालणारे दोन पाय, मन, बुद्धी काय करतात हे आपल्या सद्विवेक बुद्धीला विचारला तर समाधानकारक उत्तर मिळतंय का ? हे बघाव कारण अजून हि वेळ गेलेली नाही अजून सुरवात करू या. आपल्या शिक्षणाचा, वयाचा, अनुभवाचा इतरांना कसा उपयोग होईल, हेच पाहायला हवं. आणि अशा रीतीने अखंडपणे जगत गेल्यास आपल्या एका एका कामाची फुलं बनून जीवन हि एका आनंदाकडे दुसऱ्या आनंदाकडे जाणारी आनंदयात्रा बनते. एकचं आयुष्य आपल्या वाटेला आलेला असता त्याचा जास्तीत जास्त उपयोग करून घ्यायला हवा. आत्ता माझं वय झालं असं म्हणुन सोडून देऊ नये… नातवंकडे बघून काही तरी नानीन शिकू असे बोलून आपला वय विसरायला लावण्याची जबरदस्त ताकद आहे त्यात……                                                                                                                                                                                                                                                                             आयुष्यरुपी हिरा प्रत्येकाला मिळालेला असतो, पण त्याला पैलू पाडण्याचे काम ज्याला त्यालाच करावे लागते.

Friday 5 December 2014

प्रवास.................

                                                                                                                                             लहानपणी खेळता खेळता कधी मोठे होतो ते समजत नाही, लहानपणी फक्त एकच काम खाणे, खेळणे, मज्जा मस्ती आपण कधी विचार तरी करतो का कि जन्मापासूनच आपला हा प्रवास सुरु होतो. बालपणात आधी बालवाडी कडे प्रवास मग ती अंगणवाडीआपल्या सोबत आई बाबा ची पण शाळा सुरु होते…. रोजचे क, , रोजची अ, , , खेळता बागडता बालपण कधी सरले हे काही कळलेच नाही…….                                                                                                                   वाढता वाढता पुस्तकांचे ओझे पाठीवर आले आत्ता प्राथमिक मधून माध्यमिक मध्ये आलो. बाई गेल्या आणि मॅङम आल्या शाळा क्लास यामुळे हि मुला किती busy झाली हे आपण आजूबाजूला बघतोच। त्यात येते दहावी मग बारावी म्हणजे आत्ता पुढचा प्रवास सुरु होतो पहिली ते दहावी नंतर बारावी पाठीवरचे ओझे काही कमी होत नाही वाढता वाढता शाळा झाली हे काही कळलेच नाही। शिकता शिकता येते मग तारुण्या.. तारुण्यात आल्यावर प्रेमात पडतो, यावेळी मनात नुसता गोंधळ उठला असतो पाय ठेवायला दहा दगड असतात. कोणी बोलत, डॉक्टर हो तर कोणी बोलत वकील, अशा परिस्थितीतून जाऊन एकदाचा कॉलेज पूर्ण होऊन आपण तारुण्यात असता असता पुढच्या प्रवासकडे वाटचाल करतो. तारुण्य हरवून जाते आणि पाहता पाहता लग्नाच्या गाठीत आपण अडकतो.                                                                                              जो प्रवास आज पर्यंत एकट्याने केला असतो त्यात आत्ता सोबत एक सोबती असतो. भरपूर काम आशा आकांक्षा या सर्व विचारांनी थोडे बसू आणि बोलू  या साठी पण वेळ नसतो आजच्या या धकाधकीच्या जगात नुसता धावताना दिसतात लोक.  जीवन तरी आपले असले तरी त्यात आपली लोक आपली नाती यासाठी घर परिवार मुलांचा विचार एक नवी जवाबदारी आलेली असते.. या लग्न नंतर मुलांची शाळाआपली स्वप्न बाजूला राहून मुलांच्या भविष्याचा विचार सतत असतो. स्पर्धेच्या या युगात आत्ता आपण कुटुंबांसोबत धावत असतो. रोजच्या हजार जबाबदाऱ्या पूर्ण करून माणूस पुढे जात असतोच. आत्ता नव्या लग्नाचे गुलाबी दिवस जाऊन म्हातारपण आलेले असते. लोक अनेक वेळा बोलतात मुला मोठी कशी झाली समजलाच नाही. कारण प्रवासात सतत पुढची वाटचाल पाहताना मागे बघायचे राहूनच जाते. उद्याची काळजी आजची आजच करत असल्याने डोक्यावरचे केस कधी पांढरे होतात हे काही कळत नाही,                                                                                                                                                                                                              बोलता बोलता म्हातारपण कधी आले हे मात्र समजत नाही. धावणारे पाय आत्ता लगेच थकून जातात. चेहऱ्या वरचे तेज आत्ता हळू हळू कम झाले असते. बोलका स्वभाव आत्ता चिडचिडा झालेला असतो. ज्या मुलांसाठी संपूर्ण आयु्ष्य  वेचला असताना  आत्ता तीच मुला वृद्धाश्रमाची वाट दाखवतात तरी सुद्धा जीवनाचा प्रवास हा संपला नसतो कारण हसता हसता रडायला कधी लागलो हे मात्र आत्ता समजतच नाही.. आत्ता वेळ आली असते ती प्रवास संपवून एका दुसऱ्या जगात जाण्याची आणि जगता जगता मरण कधी येते ते हि कधी कळत नाही….